आज तो सम्राट आहे, पण जन्मापासून तो मेळघाटच्या जंगलात राहणारा एक शिकारी योद्धा होता. आपल्या मातेला मिळालेल्या यातनांचा आणि तिच्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी तो आपल्या जंगलाच्या कायद्याविरुद्ध गेला आणि औदुंबरावतचा सम्राट झाला. त्याचा संघर्ष त्याला पराक्रमी वीर बनवून गेला. त्याने आपल्या ताकदीने भारतवर्षातील अनेक बलशाली मल्लांना चित केल तो त्या युगाचा नायक ठरला, तो औदुंबरावतच्या जनतेचा रक्षक ठरला. "औदुंबरावत" ही त्याच्या पराक्रमाचीच गोष्ट नाही तर त्याची एक निरागस प्रेम कहाणी देखील आहे. अमरावतीच्या मातीत दडलेली एक विलक्षण गाथा.
please login to review product
no review added