एम.जे.अकबर या प्रसिद्ध पत्रकाराने आपल्या कुटुंबाचीच कादंबरीरूपाने सांगितलेली ही कथा.तेलिनीपाडा हेव बंगालमधले एक साधे गाव,त्या गावात फाळणीपूर्व काळात घडलेली...परिस्थितीमुळे प्रयाग नावाचा हिंदू पोरगा एका मुसलमान टपरीवाल्याचा वारसदार कसा होतो आणइ लग्नाच्या निमित्ताने रहमतौल्ला कसा बनतो,याची सहज उलगडत गेलेली ही कथा...ब्रिटिश अमदानीतले औद्मोगिक वातावरण,गांधीयुगाचे ग्रामीण भागात उमटणारे पडसाद,धार्मिक राजकारणामुळे गढूळ होत गेलेले वातावरण,नात्यानात्यांमध्ये त्यामुळे निर्माण होणारे ताणतणाव...या आणि अशाच इतरही अनेक घटकांचे प्रत्ययकारी चित्रण असल्यामुळे ही कादंबरी अत्यंत उत्कंठावर्धक ठरली आहे आणि केवळ एका कुटुंबाची कहाणी न राहता त्या कालखंडाची प्रादेशिक कहाणी म्ह्णून नावाजलीही गेली आहे.त्या कादंबरीचा हा तितकाच सुरस भावानुवाद.
please login to review product
no review added