कालनिर्णय दिनदर्शिकेतील लेख, पत्रलेखन, वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले विविध लेख, तत्काली पोलीस आयुक्त वसंत सराफ यांना लिहिलेले पत्र, श्रीकान्त ठाकरे-बाळासाहेब ठाकरे बंधूंना लिहिलेले पत्र, काही कविता असे पुलंचे विविधांगी लेखन यात आहे. - डॉ. श्रद्धानंद ठाकूर ‘गाठोडं’ वाचताना एकसारखं हसू यायला लागलं. पुलंचे शब्द वाचताना ते शब्द आपल्याला ऐकू येतात आणि पुलं स्वत:च समोर बसून गप्पा मारतात, असा भास होतो. एका अर्थाने पुस्तक वाचताना माझ्या स्मृतींचं गाठोडं उलगडलं. ‘पीएल’सोबत गप्पा, गाणं ऐकणं हा आमच्यासाठी जणू उत्सवच असायचा. पुलं म्हणायचे ‘माझ्या भोवती रसिकतेचा महापूर असावा आणि मी त्यातील पूरग्रस्त’. ‘गाठोडं’ वाचतानाही आपली अशीच स्थिती होते, पुलं पर्वातील मी प्रवासी आहे
please login to review product
no review added